शेतकऱ्याला सरकारचे उपकार नकोत. विजय मल्ल्यासारखी लोकं पळण्यापूर्वीच त्यांना पकडत नाही. पण शेतकऱ्यांने २०- २५ हजार रुपये थकवले तरी त्यांना नोटीस पाठवली जाते. राज्यातील जनता तडतफडते, तळमळते, विव्हळते, त्यांच्या आक्रोशाकडे आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे लक्ष देण्याची गरज आहे, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर मी राजकारणात असलो किंवा नसलो तरी काहीच फरक पडत नाही, असेही ते म्हणालेत. उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्याला सुरुवात केली असून नेसरीतील सभेत ते बोलत होते.
कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांना कन्नड भाषा आलीच पाहिजे, असे तिकडचे मुख्यमंत्री सांगतात. पण महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आले पाहिजे, अशी खमकी भूमिका घेणारा मुख्यमंत्री राज्याला अजूनही लाभला नाही. असा मुख्यमंत्री मला राज्याला द्यायचा आहे,तसेच शिवसेना दुतोंडी नाही. सरकार म्हणून आमच्याकडे अधिकार आहेत यातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर त्या सत्तेला लाथ मारुन जाणार, अशी गर्जनादेखील उद्धव ठाकरे यांनी केली.
मुळात सरकारने असे काम केले पाहिजे की त्यांच्यावर जाहिरातबाजीची वेळ यायला नको. जनता ही लाभार्थी नाही ते आपले दैवत आहे. जनतेचे काम करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेले आहे. लोकांच्या हालअपेष्टा संपलेल्या नाही, पण सरकारची जाहिरातबाजी सुरु आहे, याऐवजी सरकारने सिंचन प्रकल्पांवर खर्च करावा, असे त्यांनी सांगितले. योग्य शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेल असे भाजपचे नेते सांगतात. हल्ली भाजपची शेतीही ऑनलाईन होते आणि निवडणूक आल्यावर भाजपला शिवाजी महाराजांची आठवण येते, असाही आरोप त्यांनी केला.
राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो. . शिवसेना सीमाभागातील मराठी माणसाच्या मागे कायमच ताकदीने उभी राहिली आहे. ती यापुढेही त्यांना बळ देईल. तुम्ही कोल्हापूरला सारखे मंत्रिपद मागता, तुमच्या जिल्ह्यात मंत्रिपदाचे एक पार्सल आहे, त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले? अशी विचारणा करत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे व शरद पवार यांची मुंबईमध्ये गुप्त भेट झाली होती त्याबद्दल देखील उद्धव ठाकरे बोलले, ते म्हणाले , ह्या बैठकीत शेतकरी किंवा राज्याशी संबंधित विषयावर नव्हे तर मुंबई क्रिकेट असोसिएशनबाबत चर्चा झाली.
शिवसेनेच्या ‘ ह्या ‘ मास्टरप्लॅनचा भाजपने घेतलाय धसका : शिवसेना डायरेक्ट भिडणार
‘ ह्या ‘ महत्वाच्या वेळी देखील शिवसेनेने भाजपला दाखवला ठेंगा
उद्धव ठाकरे वांद्र्याचे बॉस, राहुल गांधी पप्पू तर थापा मारणारे फेकू का नको ? : सामनामधून हल्लाबोल
? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?
Pingback: ‘ आणि ‘ उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली : आले नेटीझन्सच्या रडारवर – Marathi People